आष्टी (प्रतिनिधि) :
आज सोमवार दि. 25 मार्च रोजी श्री भास्कर अकॅडमी आष्टी येथे…नुकतीच पोलिस सब इन्स्पेक्टर पदी निवड झालेल्या उजमा शेख यांचा सत्कार आयोजित केला होता.. त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
त्याच बरोबर त्यांनी भास्कर अकॅडमी च्या विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले…
या कार्यक्रमा प्रसंगी अकॅडमी च्या संचालिका श्रीमती मिराताई राख, श्री विजय राजपूरे, उजमाची आई सायरा शेख, प्रा. शिवाजी राख सर आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी उपस्थित होते…
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकटे नक्कीच असतात. मात्र, काही जण त्या संकटांमुळे, त्या परिस्थितीमुळे आहे ते स्विकारुन खचतात. तर काही जण त्या परिस्थितीवर मात करत अत्यंत कठोर परिश्रम करण्याची तयारी दर्शवतात आणि ती परिस्थिती बदलण्याचा निर्धार करुन प्रामाणिकपणे काम करत राहतात आणि एक दिवस त्या परिस्थितीवर मात नक्कीच करतात. मुस्लीम समुदायातून येणाऱ्या उजमा शेख या तरुणीचा प्रवास असाच राहिला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतवर मात करत या तरुणीने पीएसआय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. भास्कर अकॅडमी च्या कार्यक्रमात प्रा. शिवाजी राख व विजय राज पुरे यांनी प्रस्तावना केली..
पोलीस सब इन्स्पेक्टर उजमा शेख यांचा प्रेरणा देणारा संघर्षमय आपल्या प्रवास उलगडला.
माझा जन्म 1996 मध्ये झाला. पण मी 4 महिन्यांची असताना माझे वडील वारले. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर अहमदनगरमधून माझी आई मला घेऊन आपल्या माहेरी बीड जिल्ह्यातील आष्टी या ठिकाणी आल्या. आई बहीण दोन मावशी आणि मी असे सर्वजण सोबत राहू लागले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना त्याच परिस्थितीत आईने माझे पालनपोषण केले आणि आज मी उजमा पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर झाली आहे.
मी संयुक्त गट ब पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होत यशाला गवसणी घातली आहे. कोरोनामुळे 2020 ची परीक्षेला उशीर झाला आणि मग नंतर 2021 मध्ये पूर्व आणि 2022 मध्ये मुख्य परीक्षा मी दिली आहे. यामध्ये ती पास झाल्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये तिने फिजिकल टेस्ट दिली. यामध्ये मी पास झाल्यानंतर मार्च महिन्यात माझी मुलाखत झाली. यानंतर 4 जुलै 2023 रोजी माझा निकाल आला. मात्र, या निकालात फक्त 1 मार्क कमी असल्याने माझं नाव प्रतिक्षा यादीत आलं. फक्त एका मार्काने माझ यश हुकल्याने मी फार निराश झाली होती. मात्र, याचवेळी तिला तिच्या कुटुंबीयांनी फार आधार दिला. ही परीक्षा आयुष्यातील शेवटची तर परीक्षा नाही ना, मग पुन्हा देता येईलच, असे म्हणत तिच्या आईने तिचा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे यानंतरही तिने सातत्याने पाठपुरावा केला आणि शेवटी ती प्रतिक्षा यादी 18 मार्च 2024 रोजी जाहीर झाली. यामध्ये माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. माझ्या या प्रवासात आई, बहीण तिचे पती, आणि आत्याच्या कुटुंबीयांनी पण खूप मोलाचे सहकार्य केले.
उजमा हिचे शिक्षण –
माझे पहिले ते दहावीपर्यंतचे शिक्षण हे जिल्हा परिषद कन्या प्रशाळा आष्टी येथे झाले. विशेष म्हणजे याच शाळेत माझी आई सायरा शेख या शालेय पोषण आहार सेविका म्हणून कार्यरत आहेत. 2012 मध्ये दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर तिच्या शिक्षणात दोन वर्षांचा गॅप पडला. मी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली आणि 2016 मध्ये आष्टी येथील हंबर्डे कॉलेज येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर मी 2019 मध्ये आष्टी येथील हंबर्डे कॉलेज येथूनच बीसीए या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
पोलीस सेवेची आवड –
मी तुम्हा भास्कर अकॅडमी च्या विद्यार्थ्याना बोलताना सांगते की, माझ्या घरची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे माझी ही परिस्थिती बदलावी हे मनापासून वाटत होते. त्यातच मी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना मुबारक शेख नावाचे पोलीस अधिकारी आष्टीला सेवेत होते. त्यांची काम करण्याची पद्धत आणि पॉवर यामुळे मी प्रभावित झाले.. त्यावेळी माझ्या मनात पोलीस सेवेची आवड निर्माण झाली आणि हाच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर ती स्पर्धा परीक्षेसाठी वाचनाला सुरुवात केली. पण काहीच कळेना त्यांनतर माझा परिचय प्रा. शिवाजी राख सर यांचेशी झाला त्यावेळी हंबर्डे कॉलेजमध्ये असलेले प्राध्यापक शिवाजी राख यांनी मला संपूर्ण स्पर्धा परीक्षा समजून सांगितली आणि स्वतः चे स्पर्धा परिक्षा ची पुस्तक मला देऊन बेसिक ची तयारी करून घेतली त्यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले.. यदा कदाचित राख सर आष्टीत आले नसते तर मी पी एस आय होऊ शकले नसते. त्यानंतर मी पुण्यात 1 वर्षे अभ्यास केला. मात्र, कोरोनामुळे मला घरी परतावे लागले.
कोरोनाकाळात तो अनुभव अन् बाथरुमची मदत –
पुण्यातून परत आष्टीमध्ये आल्यावर मी सरस्वती अभ्यासिका ज्वाईन केली. त्याचदरम्यान, मला कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यानंतर तिथल्या मुलांनी तक्रार केल्याने मग अभ्यासिका बंद करावी लागली. घरी आल्यावर टेंशन आलं, घरी वन रुम किचन, त्यात घरात 5 जण राहणारी, त्यामुळे अभ्यासासाठी पोषक असं वातावरण नव्हतं. त्यामुळे अभ्यास कसा करायचा, हा सर्व विचार करत असतानाच अंघोळीच्या बाथरुममध्ये लक्ष गेलं आणि विचार आला हे दिवसभर रिकामंच असतं.
त्यामुळे मग मी याच बाथरुममध्ये सर्व व्यवस्था करत याचठिकाणी अभ्यास करायला सुरुवात केली. याठिकाणी मी प्रिलिअम्सची संपूर्ण तयारी केली. तब्बल 8 महिने मी या बाथरुममध्ये अभ्यास केला. यानंतर पुन्हा पुण्यात गेली आणि त्याठिकाणी मुख्य परिक्षेची तयारी गेली. दरम्यान, रनिंग करताना पायाला दुखापत झाल्याने मला दीड ते दोन महिने मैदानी चाचणीची तयारी होत नव्हती. त्या दरम्यान, लक्ष्य अकॅडमीचे विरेंद्र पडवळ सरांनी माझी तयारी करुन घेतली आणि मैदानी चाचणीत मला 100 पैकी तब्बल 90 गुण मिळाले. त्यानंतर मुलाखतीसाठी निवड झाली. मुलाखतीमध्ये मला 40 पैकी 21 गुण मिळाले. पण 1 गुण कमी मिळाल्याने माझे नाव प्रतिक्षा यादी गेले. यावेळी अत्यंत वाईट वाटलं. इतकी मेहनत केली पण एका मार्काने नाव यादी आलं नाही. त्यामुळे इतकं टेन्शन आलं की, रात्रभर झोपली नाही.
पण यादरम्यान, मी पुण्यातील रयत अॅकडमीचे उमेश कुदळे यांच्याकडे मॉक इंटरव्यू दिले होते. त्यांनी, माझ्या कुटुंबीयांनी आणि माझ्या मित्रपरिवाराने मला या काळात मोठा पाठिंबा दिला. यानंतर मी सातत्याने पाठपुरावा केला आणि शेवटी 18 मार्च 2024 रोजी प्रतिक्षा यादी जाहीर झाली आणि माझी पीएसआयपदी निवड झाली. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. आईच्या कष्टामुळे आणि तिच्या मेहनतीमुळे मला यश मिळालं आणि आता माझ्या या यशामुळे तिच्या मेहनतीला आणि कष्टाला पूर्णविराम मिळेल, अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया तिने यावेळी दिली.
समाजातील तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला –
विद्यार्थी व पालकांना संदेश देताना म्हटले की, मी तयारी करत असताना मला अनेकांनी विरोध केला. पण मी असं म्हणेन की, प्रत्येकांनी आपल्या मुलामुलींना पाठिंबा द्यायला हवा. त्यांना शिकण्याची संधी द्यायला हवी. प्रत्येकामध्ये काहीतरी गुण असतात आणि त्या कलागुणांना वाव देणं फार महत्त्वाचं आहे, असे ती म्हणाली. तसेच विद्यार्थ्यांना सांगेन की, जोपर्यंत यश मिळत नाही. तोपर्यंत थांबू नका. खचू नका. अडचणींवर मात करायला हवी. जेव्हा आपण प्रामाणिक प्रयत्न करू तेव्हा आपण शेवटपर्यंत म्हणजे यशापर्यंत नक्कीच पोहोचू. वेळ निघून गेल्यावर परत येत नाही. त्यामुळे वेळेचे सदुपयोग करायला हवा, असा सल्ला तिने विद्यार्थ्यांना दिला.
मुस्लीम समुदायातील येत असलेल्या उजमा शेख या तरुणीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पोलीस उपनिरीक्षक होत हे यश मिळवले. तिचा हा प्रवास समाजातील प्रत्येकासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
आपल्या आष्टीची मुलगी फौजदार झाली हि खूप अभिमानाची बाब आहे. या तीच्या संघर्षातून अनेकांना प्रेरणा मिळेल असे बोलून संचालिका श्रीमती मिराताई राख यांनी आभार व्यक्त केले…